राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. रविवारी राज्यात ४,८९५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ५०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत ६१ लाख ४४ हजार ३८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७१ टक्के आहे. रविवारी १५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०१ टक्के झाला आहे. तब्बल ३२ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ७१ हजार ५१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नंदूरबार (८), धुळे (३), हिंगोली (८१), अमरावती (८२), वाशिम (९१), भंडारा (०) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १४, ५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.