राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलंय. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ८६२ नव्या कोरोनाबधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात एकूण २०१९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील मृत्यूदर हा १.८३ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७८,९३,७६४ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.०१ टक्के इतकं झालं आहे.
२४ तासांत मुंबईत ४१० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद
मुंबईत दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांत मुंबईत ४१० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत २७९ रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले एकूण रूग्ण ११०४२६१ इतके आहेत. मुंबईत एकूण २ हजार २३५ रूग्ण सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे कोविड दुप्पटीचा दर २६२१ इतका आहे.
#CoronavirusUpdates
४ ऑगस्ट, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्णौ- ४१०
२४ तासात बरे झालेले रुग्ण- २७९
बरे झालेले एकूण – ११०४२६१
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८.१%एकूण सक्रिय रुग्ण- २२३५
दुप्पटीचा दर- २६२१ दिवस
कोविड वाढीचा दर ( २८ जुलै- ३ ऑगस्ट)-०.०२७%#natocorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 4, 2022
देशात १७ हजार १३५ नवीन रुग्णांची नोंद
देशात आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मागील चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचं पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत देशात १७ हजार १३५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी दिवसभरात १९ हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा : मुंबै बँकेवर दरेकरांची वर्णी लागण्याची शक्यता, मविआला धक्का