घरमहाराष्ट्रराज्यात २,४९८ नवे रुग्ण, ५० जणांचा मृत्यू

राज्यात २,४९८ नवे रुग्ण, ५० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,३०५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

राज्यात २,४९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९,२२,०४८ झाली आहे. राज्यात एकूण ५७,१५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,३०५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १२, कल्याण-डोंबिवली मनपा ३, नाशिक ३, अहमदनगर ३, सोलापूर ३, औरंगाबाद ७ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३ मृत्यू औरंगाबाद ७, ठाणे ४, नाशिक २, गोंदिया २, बीड १, भंडारा १, गडचिरोली १, पालघर १, जालना १, रायगड १, परभणी १ आणि पुणे १ असे आहेत.

- Advertisement -

आज ४,५०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,१४,४४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,४३,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२२,०४८ (१५.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५२,५३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -