घरमहाराष्ट्रभिवंडीत कचराकुंडीत सापडले ३०० आधारकार्ड

भिवंडीत कचराकुंडीत सापडले ३०० आधारकार्ड

Subscribe

भिवंडीत कचराकुंडीमध्ये ३०० ते ४०० आधारकार्ड सापडले आहेत. हे कार्ड पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होेती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदानाचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास निजामपूर पोलीस करत आहेत.

भिवंडी शहरातील अजय नगर परिसरात कचराकुंडीत शेकडो आधारकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यात आपले आधारकार्ड तर नाही ना? हे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे आधारकार्ड कचराकुंडीत मिळाल्याने या निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी निजामपुर पोलीस दाखल झाले असुन सर्व आधारकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अजयनगर येथे स्थानिक नागरिक कचरा कुंडीत कचरा टाकण्यासाठी आले असता त्यांच्या लक्षात आले की, या कचराकुंडीत आधार कार्ड पेटलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी तातडीने याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मयुरेश पाटील यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन बघितले असता कचराकुंडीत जवळपास तीनशे ते साडेतीनशे ओरिजनल आधारकार्ड फेकलेल्या अवस्थेत आढळून आले. या आधारकार्डमध्ये आपले आधारकार्ड तर नाही ना? हे तपासण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. हे सर्व आधारकार्ड २०१५ सालचे आहेत. हे आधारकार्ड भिवंडी शहरातील खडक रोड, कोंबडपाडा, अजय नगर, गोकुळ नगर इत्यादी परिसरातील आहेत. मयुरेश पाटील यांनी शासकीय यंत्रणा आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. काही कार्ड अर्धी फाटलेली, तर काही अखंड आहेत. पोलिसांनी पंचनामा करुन सदर आधारकार्ड ताब्यात घेतले आहेत.

- Advertisement -

नागरिकांची कारवाईची मागणी

ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने पोस्टाला दिली आहे. परंतु, ही आधारकार्ड त्यांच्यापर्यंत न पोहचवता ती कचराकुंडीत फेकून दिल्याने अतिशय महत्त्वाचे डॉक्यूमेंटचा दुरूपयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे डॉक्यूमेंट जर चुकीच्या व्यक्तीच्या हातात लागले तर तो याचा गैरवापर करू शकतो. तसेच लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. यामध्ये बोगस मतदान यादीत नाव नोंदवून बोगस मतदान करण्याचा कट होता, असा नागरिकांचा आरोप आहे. यातील महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि आधारकार्डचा खेळ करणाऱ्यांवर कारवाईची व्हावी, अशी मागणी तेथील स्थानिक करीत आहेत. सध्या पोलिसांनी पंचनामा करून आधारकार्ड ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर असे प्रकार कुठेतरी थांबायला हवे. सराकारच्या योजना उकिरड्यावर पडायला लागल्या तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मयुरेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -