राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ झाला असून मृतांचा आकडा ३ हजार ५९०वर पोहोचला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ५६१ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४६ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यात ५ हजार ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संख्यात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी १०२ पुरुष तर ५० महिला आहेत. तसेच १५२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८५ रुग्ण आहेत तर ५४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १५२ रुग्णांपैकी १०७ जणांमध्ये (७०.३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आज झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११७ मृत्यूंपैकी मुंबई ८७, मीरा भाईदर ८, कल्याण डोंबिवली ७, सोलापूर ७, नवी मुंबई ४, नाशिक ३ आणि वसई विरार १ असे आहेत.
हेही वाचा – ठाण्यात कोरोनाचा धोका; १० दिवसात १४५३ रूग्ण तर ४८ जणांचा मृत्यू