महाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून १० वर पोहोचला आहे. दरम्यान, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
१)सय्यद अमित समीर, वय ४५
२) नविद झमाने, वय ३५
३) नाैसिन नदीम बांगी, वय ३०
४) आदी हाशिम शैकनग, वय १६
५) अनाेळखी स्री चा मृतदेह
६) रोशनबी देशमुख, वय ५६
७) ईस्मत हाशिम शैकनक, वय ४२
८) फातिमा अन्सारी, वय ४०
९) अल्लतिमस बल्लारी, वय 27
१०) शौकत आदम अलसूलकर, वय ५०
महाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला असून आता तो ८ वर पोहोचला आहे. एनडीआरएफच्या पथकाने आणखी एक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढला.
१)सय्यद अमित समीर, वय ४५
२) नविद झमाने, वय ३५
३) नाैसिन नदीम बांगी, वय ३०
४) आदी हाशिम शैकनग, वय १६
५) अनाेळखी स्री चा मृतदेह
६) रोशनबी देशमुख, वय ५६
७) ईस्मत हाशिम शैकनक, वय ४२
८) फातिमा अन्सारी, वय ४०
महाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातवर पोहोचला असून अद्याप त्यांचे तपशील मिळालेले नाही.
या दुर्घटनेत सय्यद अमित समीर (वय ४५), नविद झमाले (वय ३५), नौसिन नदिम बांगी (वय २०) आणि हाशिम शैकनग (वय १६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
#UPDATE Maharashtra: Death toll rises to 5 in Raigad building collapse incident as NDRF recovers one unidentified female body from the site.
So far, bodies of 3 males & 2 females have been recovered & 1 male child has been rescued from the debris. Rescue operation underway https://t.co/RaoimzOsMb pic.twitter.com/vrsMhYPhpS
— ANI (@ANI) August 25, 2020
रायगड जिल्ह्यातील महाड येथे पाच मजली इमारत संपूर्णपणे ढासळल्याचे समजताच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमवेत मदतकार्याबाबत समन्वय साधून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना जलदगतीने बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ लावण्याचे आदेश दिले. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची आपत्कालीन मदत पथक (टीडीआरएफ) आणि अग्निशमन दलाची वाहनेही घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनीही मदतकार्याला सुरुवात केली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले.
चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून सुखरूपपणे बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले.
दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली. या ठिकाणी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यंमंत्र्यांनी आश्वासन दिले.
Mahad Building Collapse : ढिगाऱ्याखालून ७८ जणांना सुखरूप बाहेर काढले; १९ जणांचा शोध सुरू
Mahad Building Collapse : बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल – पालकमंत्री आदिती तटकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाड दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत त्यातील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे ट्विट केले आहे. तसेच जखमी झालेले लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही महाड दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करणारे ट्विट केले आहे.
PM Modi expresses anguish over the building collapse in Mahad, Raigad in Maharashtra.
"My thoughts are with the families of those who lost their dear ones. I pray the injured recover soon.", PM tweets pic.twitter.com/vILAdsKK1j
— ANI (@ANI) August 25, 2020
President Ram Nath Kovind expresses his distress over the Raigad building collapse tragedy in Maharashtra.
President Kovind tweets, "My thoughts and prayers are with the accident victims. I wish speedy recovery of the injured." pic.twitter.com/qR9JpTqGlr
— ANI (@ANI) August 25, 2020
खासदार सुप्रीया सुळे यांनी ट्विट करत महाड दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
महाड येथे इमारत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेत मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.त्यांना लवकर बरे वाटावे ही सदिच्छा.
— Supriya Sule (@supriya_sule) August 25, 2020
राज्यमंत्री उदय सामंत यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
महाड इमारत दुर्घटनेत दोषी बिल्डर वर कारवाई करावी अश्या स्पष्ट सूचना रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड पोलीस अधीक्षक याना केल्या आहेत..कारण ही इमारत फक्त सात वर्षांपूर्वी बांधली होती.
— Uday Samant (@samant_uday) August 24, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडमधील इमारत दुर्घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याबाबत एनडीआरएफच्या महासंचालकांशी बातचीत केली आहे. सगळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असे ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.
The collapse of a building in Raigad, Maharashtra is very tragic. Have spoken to DG @NDRFHQ to provide all possible assistance, teams are on the way and will be assisting with the rescue operations as soon as possible. Praying for everyone’s safety.
— Amit Shah (@AmitShah) August 24, 2020
या इमारतीत एकूण ९४ रहिवासी राहत होते. त्यापैकी ७५ जण सुरक्षित असून अजूनही १९ ते २० रहिवासी अडकले आहेत. या दुर्घटनेत समीर सय्यद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी आता पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये बिल्डर, वास्तुविशारद, आरसीसी सल्लागार, मुख्याधिकारी आणि इंजिनीअर यांचा समावेश आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा बिल्डर पसार झाला असून ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल, अशी माहिती स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला असून आणखी १८ जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता आहे.
Maharashtra: Search & rescue operation by National Disaster Response Force (NDRF) underway at the spot where a building collapsed in Kajalpura area of Raigad district y'day. (Image source: NDRF)
As per Raigad District Collector, 2 deaths reported so far, 18 still feared trapped. pic.twitter.com/lYEc0DnhDW
— ANI (@ANI) August 25, 2020
रायगड जिल्ह्यात महाड येथे काल, सोमवारी सायंकाळी इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्थानिक प्रशासनानेही युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. या ठिकाणी आठ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून आतापर्यंत ७ जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू या दुर्घटनेत झाला आहे.
Maharashtra: Search and rescue operation continues at the spot where a building collapsed in Kajalpura area of Raigad district last evening. As per Raigad District Collector Nidhi Chaudhari, two deaths reported so far, 18 still feared trapped. (Latest visuals) pic.twitter.com/nEgfpVFtJ3
— ANI (@ANI) August 25, 2020
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. येथे तीन एनडीआरएफची टीम दाखल झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद आहे. तर जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत. काहींना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, तसेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती यावेळी अदिती तटकरे यांनी दिली. दरम्यान, रात्री उशीर कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
3 NDRF teams are here. One death reported so far. Injured are being treated & some are discharged. Those with serious injuries were taken to Mumbai for advanced treatment. Probe has begun. We want that Special Investigation Team be constituted: Maharashtra Minister Aditi Tatkare https://t.co/dMvjlElGuQ pic.twitter.com/vjzDjdrPn7
— ANI (@ANI) August 25, 2020
शहरातील काजळपुरा विभागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, आतापर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. सन २०११ मध्ये पनवेलच्या कोहिनूर डेव्हलपरने या इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीच्या दोन विंगमध्ये एकूण ४७ सदनिका असून, राहणार्यांची संख्या २०० पर्यंत आहे. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होतं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
#UPDATE Search and rescue operation underway at the spot where a building collapsed in Kajalpura area of Raigad district last evening. One dead and seven injured, several others still feared trapped under the debris. #Maharashtra pic.twitter.com/S1Sr6PNgdH
— ANI (@ANI) August 24, 2020