घरCORONA UPDATEकोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखाची मदत 

कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखाची मदत 

Subscribe

राज्यशासनाच्या धर्तीवर ५० लाख रुपये आर्थिक मदत एसटी महामंडळातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब सोमावरी केली आहे.

एसटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त, कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कोविड-१९ मुळे मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबियांना राज्यशासनाच्या धर्तीवर ५० लाख रुपये आर्थिक मदत एसटी महामंडळातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब सोमावरी केली आहे. ही घोषणा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे राज्यातील विविध एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी तसेच विभाग नियंत्रकांशी ते बोलत असताना केली आहे.

भर उन्हामध्ये रस्त्याने पायपीट करत, चालत जाणाऱ्या परप्रांतीय श्रमिकांना आपल्या एसटीने मोलाचा आधार दिला आहे. राज्यशासनाच्या निर्देशनुसार ९ मे पासून ३१ मे पर्यंत एसटीच्या तब्बल ४४ हजार १०६ बसेसद्वारे सुमारे ५ लाख ३७ हजार ५९३ श्रमिकांना मोफत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत अथवा नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंत सुखरूप नेऊन सोडण्याचे काम एसटीच्या बहाद्दर कर्मचाऱ्यांनी करून दाखवले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे कोविड  योद्धे (डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी), विद्यार्थी, ऊसतोडणी कामगार मजूर अशा विविध घटकांचे एसटीने सेवा दिली आहे. परंतु, कोविडच्या संकटनंतर एसटीच्या आर्थिक स्थितीला सावरून पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक योगदान आवश्यक असणार आहे.

- Advertisement -

त्यासाठी नाविन्यपूर्ण सूचना व मार्गदर्शनाचे एसटीच्या वरिष्ठ प्रशासनाकडून स्वागतच केले जाईल याची त्यांनी ग्वाही परिवहन मंत्रीअनिल परब यांनी दिली. गेल्या ७२ वर्षांमध्ये महाराष्ट्राची जीवनवाहिणी म्हणून काम करणाऱ्या एसटीने सर्वसामान्य प्रवाशी जनतेची विश्वारहार्ता जपली आहे, या संकट प्रसंगी सगळे जग स्तब्ध झाले असताना, एसटीने मात्र वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदतीचा हात देऊन आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. येणार काळ अत्यंत खडतर असून, अगोदरच सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करणाऱ्या एसटीला भविष्यात माल वाहतुकीसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागणार आहेत. तसेच उपलब्ध साधन सामग्रीचा अत्यंत नियोजनपूर्वक व काटकसरीने उपयोग करून किमान तोटा होणार नाही इतपत कार्यक्षमता वृद्धिंगत करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -