घरमहाराष्ट्रपुणेअलमट्टी धरणातून 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, धरण 95 टक्के भरले

अलमट्टी धरणातून 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, धरण 95 टक्के भरले

Subscribe

अलमट्टी धरण 95 टक्के भरले आहे. यामुळे धरणातून 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

अलमट्टी धरण 95 टक्के भरल्यामुळे धरणातून 72 हजार क्युसेक्स पाण्याच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 3 दिवासांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यापूर्वी धरणातून 6 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 टीएमसी आहे. धरणात सध्या 37 हजार पआमअयाची आवक होत असून 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीची पातळी 33 फुटावर –

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पडले आहे. आज 4 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील ५ वक्राकार दरवाजे उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. पाॅवर हाऊसमधून 1 हजार क्युसेक्स असा एकूण 1 हजार 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने माहिती दिली आहे.

पोलिस अधीक्षकांकडून सतर्कतेचे आवाहन –

- Advertisement -

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वेगाने वाढ होत आहे. यामुले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

राधानगरी धरण 86 टक्के भरले –

राधानगरी धरण 85.95% भरले आहे. आज दिवसभरात धरण क्षेत्रात 150 मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली. धरणाची पाणीपातळी 333.58 फूट इतकी असून धरणात 7.19 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण 2563 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वीज निर्मिती केंद्रातून 1600 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. यामुळे भोगावती नदी पात्रात पाणी पातळी वाढ होत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोरा असाच राहिला तर दोन दिवसात राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -