घरमहाराष्ट्रपुणेमुंबई-पुणे महामार्गावर अपघात, 11 वाहने एकमेकांना धडकली

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, 11 वाहने एकमेकांना धडकली

Subscribe

आज (ता. 27 एप्रिल) मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ एक विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकूण 11 वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात घडला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांत (Mumbai-Pune Highway Accident) गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाहन चालक नियम मोडत वाहन चालवत असल्याने या महामार्गावर अपघातात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज (ता. 27 एप्रिल) मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ एक विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकूण 11 वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या या अपघातात चार महिला जखमी झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात गेल्या काही दिवसांत बऱ्याच अपघातांची नोंद करण्यात आली आहे. आज देखील बोरघाट उतरत असताना हा अपघात झाला आहे. खोपोलीच्या एक्झिटजवळ ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. यामध्ये ट्रकने एक-दोन नाही तर तब्बल 11 वाहनांना धडक दिली.

या घटनेनंतर ट्रक चालक हा घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रायगड पोलिसांकडून या पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत आहे. बोरघाटाच्या उतारावर हा अपघात घडल्याने यामध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सुद्धा याच मार्गावर ट्रक आणि बसचा अपघात झाला होता. या अपघातात देखील चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

- Advertisement -

अगदीच काल बुधवारी मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. तर 22 प्रवासी जखमी झाले होते. कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता. तर या अपघातात बस दुभाजकाला धडकली आणि पलटी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील काही महामार्ग असे आहेत ज्या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना या घडत आहेत. ज्यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -