घरताज्या घडामोडीरस्त्यावर दिसले तर विचारा गद्दार का झालात? आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

रस्त्यावर दिसले तर विचारा गद्दार का झालात? आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

Subscribe

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, देसाई साहेबांसारखा एकनिष्ठ शिवसैनिक. डाओसमध्ये त्यांनी काम करून दाखवलं, इथले पालकमंत्री म्हणून काम करत होते, साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली, आणि पक्ष वाढवण्याचं कामंही केलं, असं कौतुक आदित्य ठाकरे यांनी सुभाष देसाई यांचं केलं.

औरंगाबादचं नाव संभाजी नगर करता आल्याने अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं याचा अभिमान आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, उद्या रस्त्यावर दिसले तर त्यांना हात जोडून विचार गद्दार का झालात? असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. यावेळी शिवसैनिकांकडून देखील जोरदार प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने निमित्ताने महाराष्ट्रात शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, इथलं वातावरण, हे चित्र पाहिल्यावर माझी एवढीच इच्छा आहे, जे गद्दार आहेत त्यांनी येऊन बघावं आणि जाणून घ्याव्यात लोकांच्या मनात काय आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिला निर्णय रायगड किल्ल्याच्या संवर्धनसाठी ६०० कोटी देण्याचा घेतला, आणि शेवटचा निर्णय संभाजी नगर करण्याचा. जिथे जातोय तिथे उद्धव साहेबांबद्दल प्रेम आणि तुमचे आशीर्वाद मला मिळताहेत. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सगळं ओळखून आहे, सगळं बघत आहे. जिथे जातोय तिथे लोक शिवसैनिक भेटून सांगतायत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘बाबांनी अडीच वर्षांत प्रत्येक क्षण जनतेच्या सेवेसाठी वेचला’; आदित्य ठाकरेंनी सांगितली आठवण

आज सकाळी हनुमान आणि रामाचं दर्शन झालं, पवित्र नातं; पण चांगलं दर्शन झालं. नंतर बोलावं कोणावर लागतंय तर, ते गद्दारांवर…! तुमचे आशीर्वाद घ्यायला निघालोय. नव्या सरकारचा पोरकटपणा होता, हे आपण निर्णय घेतले होते त्याला स्थगिती दिली. संभाजी नगर नावाला स्थगिती, नवी मुंबई एअरपोर्ट, धाराशिव नावाला स्थगिती दिली, पण लोकांनी विरोध केल्यावर स्थगिती हटवली. आपण नाव बदलताना कोणत्याही जाती धर्मात दंगली झाल्या नाहीत म्हणून त्यांच्या पोटात दुखलं असेल. स्थगिती देऊन मग दंगल होईल, वाद वाढतील मग नाव परत देऊ असं त्यांना वाटलं असेल. गेली अडीच वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत काम करत असताना महाराष्ट्र शांत, प्रगतिशील राहिला. आपण आयोद्धेला गेलो, तिरुपती नवी मुंबईत बनवतोय, अयोद्धेत महाराष्ट्र सदन बनवण्याचा निर्णय घेतला होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, देसाई साहेबांसारखा एकनिष्ठ शिवसैनिक. डाओसमध्ये त्यांनी काम करून दाखवलं, इथले पालकमंत्री म्हणून काम करत होते, साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली, आणि पक्ष वाढवण्याचं कामंही केलं, असं कौतुक आदित्य ठाकरे यांनी सुभाष देसाई यांचं केलं.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंनी याआधीच हे दौरे केले असते तर.., गुलाबराव पाटलांचा शिवसंवाद यात्रेवरून टोला

गेल्या अडीच वर्षात कधीही राजकीय मेळाव्यासाठी इथे आलो नाही, विकास कामाच्या कार्यक्रमासाठी येत राहिलो. अडीच वर्षात केवळ विकास कामासाठी आलो. मी रात्री 2 वाजता फिरून रस्त्यांची पाहणी केली आणि रस्ते कसे होत आहेत हे पाहिलं. माझं या आमदारांना चॅलेंज आहे जे पैसे तीन टर्म नाही मिळाले तेवढे दिले. सगळं नीट चाललं होत तर मग गद्दारी का? त्यांच्या पत्रकार परिषदा पहा चेहरे कसे पडले आहेत. मला तुम्ही आसूड दिला त्याचा वापर मी करणार नाही तुम्ही मतदानाच्या पेटीतून उत्तर द्या. आपण मिठी मारली पण त्यांच्या हातात सुरा होता, हे कळलं नाही, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -