घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा अॅक्शन मोडमध्ये; शिंदे गटाकडे सगळ्यांच्या नजरा

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा अॅक्शन मोडमध्ये; शिंदे गटाकडे सगळ्यांच्या नजरा

Subscribe

महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना काल (बुधवारी) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचबरोबर लोकांच्या नजरा टीम शिंदेच्या पुढील वाटचालीकडे लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आज सहकारी आमदारांची भेट घेणार आहेत. ते राज्यपालांनाही भेटू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सध्या सरकार स्थापनेचा दावा करणार नाही. एकनाथ शिंदे सकाळी 10 वाजता आपल्या बंडखोर आमदारांची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीनंतर शिंदे आज  राज्यपालांना भेटू शकतात, त्यानंतरच सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. येत्या तीन दिवसांत सरकार स्थापनेचा दावा करून शपथविधी सोहळा आयोजित केला जाऊ शकतो.

केसरकर काय म्हणाले –

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टपूर्वी राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून सर्वांच्या नजरा भाजप आणि बंडखोरांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. बंडखोर छावणीची पहिली प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशी लढताना आम्हाला आमच्या नेत्यांवरही नाराज व्हावे लागले याचे दुःख आम्हा सर्वांना आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी आणि संजय राऊत ज्यांचे रोजचे काम केंद्र सरकारच्या विरोधात वक्तव्ये करणे आणि केंद्र व राज्य यांच्यात दुरावणे हे आहे.

संजय राऊत काय म्हणाले –

- Advertisement -

शिवसेना खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राने आज एक संवेदनशील मुख्यमंत्री गमावला आहे. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. आम्ही लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवू, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरें काय म्हणाले –

उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देत आकड्यांच्या खेळात पडण्याची इच्छा नसल्याचे सांगितले.उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला संबोधीत केले. उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काम आम्ही केले. उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण केले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे नाव घेत उद्धव यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

भाजपचा जल्लोष –

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेत्यांनी मिठाई खाऊ घातली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री सांगितले की, पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता पुढील निर्णय घेतील. प्रदेश भाजप युनिटने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे काल सकाळी गुवाहाटी मंदिरात पोहोचले होते. गेल्या आठवड्यापासून शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेल्या काही बंडखोर आमदारांसह त्यांनी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिराला भेट दिली.

शिंदे गट गोव्यात दाखल –

अनेक अपक्ष आमदारांसह नाराज शिवसेनेचे आमदार 22 जूनपासून मुंबईपासून सुमारे 2,700 किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटीत तळ ठोकून होते. आसाम सरकारने बुधवारी सांगितले की, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर असंतुष्ट आमदार, जे गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आठवडाभरापासून थांबले आहेत, ते राज्याचे “पाहुणे” आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी संध्याकाळी गुवाहाटीहून गोव्यात  आल्यानंतर पणजीजवळील दोना पावला येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. हे आमदार गेल्या आठ दिवसांपासून गुवाहाटीत तळ ठोकून होते.

 

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -