घरताज्या घडामोडीशरद पवारांबद्दल बोलताना तारतम्य पाळावे, अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं

शरद पवारांबद्दल बोलताना तारतम्य पाळावे, अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं

Subscribe

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उंची तसेच देशपातळीवरील काम पाहून त्यांच्याबद्दल नव्या पिढीने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी फटकारले.

गोवा, उत्तर प्रदेशसह देशातल्या पाच राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गल्लीतला पक्ष आहे. या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

- Advertisement -

आज पुण्यात बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेतला. कोणालाही कमी जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करीत तिथपर्यंत पोहोचलेला असते. राजकारणाबद्दल खूप काही बोलता येईल. पण महाराष्ट्रापुरते जे काही असेल ते मला विचारा, त्याची सडेतोड उत्तरे देईन. पण देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राजकीय जीवनात मला ३० वर्षे झाली. मला बारामतीकरांनी खासदार म्हणून निवडून दिले होते, पण सहा महिन्यात मी परत आलो. शरद पवार यांना दिल्लीला जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. मी महाराष्ट्रात समाधानी आहे, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा, कोरोना बैठकीनंतर अजित पवारांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -