घरताज्या घडामोडीअजित पवार यांचे नितेश राणेंच्या टीकेवर प्रत्युत्तर, म्हणाले मी दुसऱ्याच्या टीकेला किंमत..

अजित पवार यांचे नितेश राणेंच्या टीकेवर प्रत्युत्तर, म्हणाले मी दुसऱ्याच्या टीकेला किंमत..

Subscribe

कोणीही टीका करतं त्याला कितपत महत्त्व द्यायचे हे आपल्यावर - अजित पवार

राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुरपररिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजकीय मंडळी कोकण दौरा करत आहेत. या दौऱ्यांवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून टीकास्त्र डागली जात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात एकेरी शब्द उच्चारले होते यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य भाषा वापरली पाहिजे असे म्हटलं होते. अजित पवारांचे सागणं म्हणजे राज कुंद्राने कोणता चित्रपट बघावा हे सांगण्यासारखे आहे अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. याला आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी अजित पवार यांना नितेश राणेंच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, कोणीही टीका करतं त्याला कितपत महत्त्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असतं दुसऱ्याच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही. अशा शब्दात अजित पवार यांनी नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

अजित पवार यांची नारायण राणेंवर टीका

कोकणात आलेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते दौरे करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी चिपळूण भागाचा दौरा केला या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सर्व स्थानिक यंत्रणा आणि अधिकारी उपस्थित होते. यामुळे राणेंसोबत एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात अरे-तुरे शब्द वापरले होते. यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होते. नैसर्गिक संकटाची पाहणी करायला आलेल्या काही लोकांनी मुख्यमंबद्दल अरे-तुरे असे शब्द वापरले आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पूरग्रस्तांना भेटायला आला होता की अधिकाऱ्यांना भेटायला आला होता. असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

नारायण राणे काय म्हणाले

इथलं प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियामांची, प्रोटोकॉलची माहिती नाही. बाजारपेठेत आल्यावर एकही अधिकारी येऊन भेटले नाहीत. अॅडिशन कमिश्नर, प्रांत अधिकारी कार्यालयात बसून आहेत दोन विरोधी पक्षनेते, एक केंद्रीय मंत्री चिपळूणमध्ये आले असूनही ते भेटायला आले नाही. हा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे आणि त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही. केंद्रीय विभागात कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे अधिकारी खुर्चीवर आमच्या विभागात राहता कामा नये लोकं रडत आहेत आणि अधिकारी मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले आहेत. मुख्यमंत्री पाहुणे आहेत का? त्यांचे कामच आहे. अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -