रविवारी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या तिसऱ्या आणि अखेरचा दिवशी ‘संमेलनाची वारी’ हे प्रमुख आकर्षण ठरलं. नाटय़ संमेलनाच्या इतिहासातील संमेलनाध्यक्ष तसंच यंदाचे अध्यक्ष यांच्या कर्तृत्वाची दखल या आगळ्या वेगळ्या ‘वारी’मधून घेण्यात आला. नागपूर शाखेने निर्मिती केलेल्या या कार्यक्रमात शहरातील सुमारे २०० कलाकारांनी सहभाग घेतला होता.
संमेलनाच्या अखेरच्या टप्प्यातील कलाप्रकारांची सुरुवात झाली ती मध्यरात्री १ वाजता ‘अस्सा नवरा नको गं बाई’ या विनोदी नाटकाने. त्यानंतर सकाळी ९ वाजता अमरावती शाखेच्यावतीने ‘मोमोज’ ही अनोखी एकांकिका सादर करण्यात आली. त्यानंतर नवोदित कलावंतासाठी एकपात्री सादरीकरणाचा खुला कार्यक्रम पार पडला. तर ११ च्या सुमारास ‘संमेलनाची वारी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
‘मराठी रंगभूमी – उणे मुंबई पुणे’
दुपारच्या सत्राची सुरुवात झाली ती ‘मराठी रंगभूमी – उणे मुंबई पुणे’ या परिसंवादाने. यामध्ये रजनिश जोशी, हिमांशू स्मार्त, मुकुंद पटवर्धन, वानम पंडित, डॉ. दिलीप घारे, दत्ता पाटील, क्षितिज झावरे, डॉ. सतीश पावडे, डॉ. सतीश साळुंके, सलीम शेख आणि विवेक खरे आदी तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.
‘मराठी नाटक हे मुंबई, पुण्यासारख्या शहरी कोंदणाच्या बाहेर पडण्याची गरज आहे आणि खरं नाटक हे गावा-खेड्यांकडेच आहे’, यावर तज्ञांचे एकमत झाले. मोठ्या शहरांमध्ये नाटकाला जितकी प्रसिद्धी मिळते, त्यांची जितकी जाहिरात केली जाते.. तितकीच किंबहुना त्याहून अधिक प्रसिद्धी आणि मान-सन्मान ग्रामीण भागातील नाटकांना मिळेल आणि त्यातूनच ही नाटकं जगासमोर येतील’… असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.
शेतकऱ्यांच्या दाहक व्यथा – ‘तेरवं’
संमेलनाच्या तिसऱ्या दिसवशीचं दुसरं मुख्य आकर्षण ठरला हा दीर्घाक. याचं वैशिष्ट्य म्हणजे वास्तवात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा सुना आणि मुलींनी या नाटकात काम केले. ‘तेरवं’च्या माध्यमातून या पीडितांनी आपली ज्वलंत व्यथा मांडली. याचं लिखाण श्याम पेठकर यांनी तर दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केलं होतं. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या बालकलाकारांनी सादर केलेला गीतरामायण कार्यक्रम संपन्न झाला.
गडकरी, तावडेंचा यूटर्न