घर ठाणे वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार, आनंद परांजपेंची माहिती

वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार, आनंद परांजपेंची माहिती

Subscribe

महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर समन्वयक तथा, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

येत्या १ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

ठाणे शहरातून सुमारे १९७ बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या असून ठाणे शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील सुमारे १० हजार कार्यकर्ते या सभेला जाणार आहेत. दुपारी 3 वाजता सर्व बसगाड्या मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, असे परांजपे यांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, मुरबाड, शहापूर , अंबरनाथ, बदलापूर येथूनही साधारणपणे १५ ते २० हजार कार्यकर्ते वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार आहेत, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

- Advertisement -

१६ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची नागपुरात वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, १ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडणार असून उद्धव ठाकरे यांची तोफ केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील शिंदे सरकार यांच्यावर धडकणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, ४०-५० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती


 

- Advertisment -