घरमहाराष्ट्रश्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावात दोन गटांमध्ये तणाव, पोलिसांकडून बळाचा वापर

श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावात दोन गटांमध्ये तणाव, पोलिसांकडून बळाचा वापर

Subscribe

श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावामध्ये दोन गटांमध्ये वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांकडून दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावामध्ये दोन गटांमध्ये वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांकडून दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु दोन्हीही गट पोलिसांचे ऐकायला तयार नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. काल (ता. १९ एप्रिल) रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून घटनास्थळी जमलेल्या जमावाला पांगविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावामध्ये होळीचे मैदान आहे. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते. याच ठिकाणी हिंदू ग्रामस्थांची सान देखील भरली जाते. ज्या ठिकाणी सान भरली जाते त्या ठिकाणी धर्मध्वज लावण्यात आलेले होते. या धर्मध्वजाच्या शेजारीच दुसऱ्या गटातील लोकांनी त्यांच्या धर्माचे झेंडे फडकविल्यामुळे दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत सौम्य लाठीमार केला व जमावाला पांगविले.

- Advertisement -

हेही वाचा – मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खारघर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची भाजपवर आगपाखड

या प्रकारानंतर जसवली गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर संपूर्ण गावामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. या गावात पोलिसांची गस्त वारंवार सुरू आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन शहरात देखील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यावेळी कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी श्रीवर्धन या ठिकाणी येऊन गावातील नागरिकांच्या बैठका घेऊन शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. दोन्ही गटामधील लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली आहे. तर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये अजून जे काही गुन्हेगार दिसतील त्यांना देखील अटक करण्यात येईल असे सोमनाथ घार्गे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील – राज ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -