घरमहाराष्ट्रभगीरथ भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ - जयंत पाटील

भगीरथ भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – जयंत पाटील

Subscribe

महाराष्ट्र सरकार कसं अडचणीत येईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे

राज्यावर कोरोनाचं संकट आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे.आम्ही तिघेही एकदिलाने या संकटाचा सामना करत आहोत. या मतदारसंघातही आम्ही एकदिलाने लढतो आहे त्यामुळे भगीरथचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा आज रांजणी, पंढरपूर येथे शुभारंभ करण्यात आला.

भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ मेहनत घेत आहे. रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस हा विजय मिळवेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज भाजपने इथे उमेदवार दिला आहे. भारतनाना भालके विरोधी पक्षाचे आमदार होते तेव्हा भाजप सरकारने या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. ३५ गावांचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील इतर प्रश्न असतील, नानांनी प्रत्येक वेळी भाजपशी संघर्ष केला याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

- Advertisement -

आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे असा टोला जयंत पाटील यांनी यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

आज पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाही, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकार कसं अडचणीत येईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर तात्काळ या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढले असते मात्र तपास एनआयएकडे आहे. हा तपास संथगतीने सुरू आहे का असा प्रश्न आता पडतोय. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे सरकार असल्या कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, ना आमच्या सरकारमध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जातील याची खात्रीही जयंत पाटील यांनी दिली.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे मंगळवेढ्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करत आहेतच पण अजितदादांनी संपूर्ण सरकार भगीरथ भालकेच्या मागे उभे राहणार आणि मंगळवेढ्याच्या विकासात तसूभर गोष्टीही कमी पडू देणार नाही असे आज स्पष्ट केले.


हेही वाचा : आता राज्यात मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’, वाचा नवी नियमावली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -