टाळी एका हाताने वाजत नाही, अशा शब्दांत राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज्यपाल आणि सरकार यांच्यात विमानवारीवरून निर्माण झालेल्या संघर्षावर पालकमंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्यपाल आणि सीएमओ यांनी एकमेकांचा मान-सन्मान राखायला हवा. मंत्रिमंडळाने राज्यपालांचा मान ठेवायला हवा, तसाच राज्यपालांनीही मंत्रिमंडळाच्या निर्णयावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रत्यत्रात मात्र तसे होताना दिसत नाही. राज्यपालांची भूमिका ही लोकशाहीसाठी घातक असल्याचे भुजबळ म्हणाले.