भुसावळ येथील नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर रविवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी काही इसमाणी गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील बाबुराव खरात, मुलगा सागर रवींद्र खरात आणि रोहित रवींद्र खरात यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी खरात यांच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार सुरु केला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचाराम्यान मृत्यू झाला. याशिवाय अजूनही चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
भुसावळमध्ये नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर गोळीबार. जुन्या वादातून अज्ञाताने केलेल्या गोळीबारात नगरसेवकासह ५ जणांचा मृत्यू | #MyMahanagar
— My Mahanagar (@mymahanagar) October 7, 2019
काय आहे नेमके प्रकरण?
रविवारी रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास रवींद्र खरात यांच्या घराजवळ काही इसम आले. त्यांनी रवींद्र खरात यांच्या घराच्या अंगणातच अंधाधुंद गोळीबार सुरु केला. त्यानंतर घराबाहेर आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रवींद्र खरात (५०), त्यांचे भाऊ सुनील खरात (५५), मुलगा सागर खरात (२४), रोहित खरात (२०) यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्या पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा रितेश यांच्यासह अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह भुसावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हे तीनही आरोपी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबारामागील कारण अध्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा – आग्रीपाड्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा आवळून हत्या