घरमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरेंची चिंता नसावी :...

बाळासाहेब थोरातांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरेंची चिंता नसावी : चंद्रकांत पाटील

Subscribe

मनसे आणि भाजपा यांच्या युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. भाजपाचा मनसेच्या भूमीकांना उघडपणे मिळणारा पाठींबा पाहता इतर राजकीय पक्षांनीही त्यांच्या युतीची चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

मनसे आणि भाजपा यांच्या युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. भाजपाचा मनसेच्या भूमीकांना उघडपणे मिळणारा पाठींबा पाहता इतर राजकीय पक्षांनीही त्यांच्या युतीची चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. तसंच, “राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी”, असं वक्तव्य करत त्यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला हाणला.

“भाजपचा अजेंडा जरी बाळासाहेब थोरात यांनी राबवला तरी आम्ही स्वागत करु. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झाली असती. सध्या मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

- Advertisement -

शिवाय, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी आज दंड भरले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांचाही समावेश आहे. चंद्रकात पाटील यांनी 14,200 रुपयांचा दंड भरला. मात्र हा दंडभरल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “कोल्हापूर-पुणे महामार्गावर अनेक कॅमेरे लावले आहेत. थोडा वेळ वाढला की लगेच दंड केला जातो. आताचा दंड देखील भरला आहे. रस्ते चांगले झाले, मग नागरिकांनी गाड्या चांगल्या घेतल्या. आता त्याला स्पीड लिमिट लावलं जातं आहे. अशा दंडामुळे घरं दारं विकायची वेळ येईल”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळई नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊतांवरही टीका केली. “राजद्रोह, देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जातो. मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो?”, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे. तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झालं आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला विविध संगटनांनी विरोध केला होता. पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परावनगी देऊ नये अशी मागमी केली होती. मात्र, अखेर राज यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे. या सभेसाठी पोलिसांनी 15 अटी घातल्या आहेत. त्यामुळं 1 मे रोजी होणारी सभा राज ठाकरेंना अटींचं पालन करुनच घ्यावी लागणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे.


हेही वाचा – वाहतूक नियम मोडण्यात राजकीय नेते अग्रेसर; उपमुख्यमंत्र्यांनी भरला 27,800 रुपयांचा दंड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -