घरताज्या घडामोडी२५ वर्षांच्या सत्तेनंतरही पावसाळ्यात मुंबईकर असुरक्षित, भाजप आमदारांची आदित्य ठाकरेंवर टीका

२५ वर्षांच्या सत्तेनंतरही पावसाळ्यात मुंबईकर असुरक्षित, भाजप आमदारांची आदित्य ठाकरेंवर टीका

Subscribe

मुंबईत ७८ टक्के नव्हे फक्त ३५ टक्के नालेसफाई झाली आहे. पालिकेचा आकडा हा रतन खत्रीचा आकडा आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर मुंबई तुंबली तर त्यास शिवसेना, मंत्री आदित्य ठाकरे व काँग्रेसचे नेते नाना पटोले हे कारणीभूत असतील. तसेच, २५ वर्षे पालिकेत सत्ता उपभोगल्यानंतरही जर पावसाळयात मुंबईकरांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसाल तर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार व नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबईत सध्या नालेसफाईची कामे जोरात सुरू आहेत. पालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, भालचंद्र शिरसाट आदींसमवेत भाजप नेते आशिष शेलार यांनी, गुरुवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी, मालाड येथील वलनाई, जूहु येथील एसएनडीटी तर कुर्ला येथील मिलिंद नगर नाल्यावर जाऊन कामाची पाहणी करण्यात आली. सदर नाले कचरा व गाळाने भरलेले आढळून आले,असे सांगत, आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागत वरीलप्रमाणे मागणी केली.

- Advertisement -

नालेसफाईच्या कामांबाबत आज आम्ही पालिका आयुक्तांना भेटणार हे माहिती झाल्याने मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमच्या अगोदरच पावसाळी कामांबाबत आढावा बैठक घेत धावाधाव सुरू केली. वास्तविक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एक महिन्यापूर्वी बैठक घेतली होती. मात्र आता पालकमंत्री उशिराने जागे झाले, असा आरोप आमदार शेलार यांनी यावेळी केला.

मुंबईत पावसाळा तोंडावर आलेला असताना नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. मुंबईत इमारत दुर्घटना घडली, बत्ती गुल झाली, अतिवृष्टी झाली तर पालिकेचा आपत्कालीन प्लॅन तयार असल्याचे दिसत नाही. यंत्रणेत समन्वय नाही. मुंबई आमची म्हणता तर मुंबईकरांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या सुरक्षिततेसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स,पार्ट्या सोडून पालकमंत्री यांनी रस्त्यावर उतरून दाखवावे, असे आव्हान आमदार शेलार यांनी शिवसेनेला दिले आहे. जर भाजप पालिकेत सत्तेवर आली तर गेल्या २५ वर्षात सत्ताधारी शिवसेनेला जी कामे करता आली नाही ती कामे निम्म्या कालावधीत पूर्ण करण्यात येतील, असा दावाही आमदार शेलार यांनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा : RCB vs GT: आयपीएलमध्ये ५७ धावांचा टप्पा आणि कोहलीचा विक्रम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -