घरमहाराष्ट्रशिवसेनेची बेळगाव-बंगालच्या निकालावर भाष्य करण्याची औकात नाही - आशिष शेलार

शिवसेनेची बेळगाव-बंगालच्या निकालावर भाष्य करण्याची औकात नाही – आशिष शेलार

Subscribe

बेळगावमध्ये शिवसेनेने ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता, त्या शुभम शेळकेचा पराभव झाला आहे. शुभम शेळकेच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासादार आणि प्रवक्ते संजय राऊत बेळगावला गेले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर टीका केली होती. याचा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बेळगाव असो किंवा बंगाल निवडणूक असो, यावर भाष्य करण्याची संजय राऊत आणि शिवसेनेची औकात नाही, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार प्राहार केला. बेळगाव असो किंवा बंगाल यावर बोलण्याची संजय राऊत आणि शिवसेनेची औकात नाही आहे. जे स्वत: कुबड्यांवर आहेत, ज्यांचं सरकार कुबड्यांच्या आधारावर उभं आहे आणि ज्यांचं पहिलं पाऊल ही कुबड्यांच्या आधाराशिवाय पडू शकत नाही, अशा पक्षाने दुसऱ्याबद्दल बोलणं आणि दुसऱ्या पक्षाच्या यशाबद्दल बोलण्याची शिवसेनेची औकातच नाही आहे, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.

- Advertisement -

राजकारणात यशाची भाषा करायची असेल तर एकटे यावे नाही तर कोणाला घेऊन यावे भाजप कोणाला घाबरत नाही, असं देखील शेलार म्हणाले.

अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट

भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजप कडेच आहे. जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्ती बद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली, असं शेलार म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -