घरताज्या घडामोडीतरूणांना जोडण्यासाठी भाजयुमोचे ‘युवा वॉरियर्स’ अभियान

तरूणांना जोडण्यासाठी भाजयुमोचे ‘युवा वॉरियर्स’ अभियान

Subscribe

डिसेंबर पर्यंत २५ लाख युवकांना जोडणार

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभर ‘युवा वॉरियर्स’ अभियान राबविण्यात येणार आहे. तरुणाईला जोडणार्‍या या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी नाशिक येथून करण्यात आला आला. या मोहिमेव्दारे डिसेंबरपर्यंत २५ लाख युवकांना जोडले जाणार असून ‘वन बुथ २५ युथ’ ही संकल्पना राबवणार असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित या अभियानाच्या पत्रकार परिषदेप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत भाजयुमोच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात आवड असणार्‍या युवांना जोडून त्यांच्यासाठी त्यांना रुची असणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरुणाईला जोडणारा हा ‘युवा वॉरीयर्स’ उपक्रम आहे. युवक ही भारताची शक्ती आहे. या शक्तीचा सदुपयोग करून देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले, सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. या युवाशक्तीला दिशा देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्यास त्याचा उपयोग आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी होऊ शकतो. अशा विविध क्षेत्रातील युवांनी या लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग व्हावे आणि देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे या हेतूने भाजयुमोतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापालिका स्थायी समिती सभापती गणेश गीते, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

- Advertisement -

15 ते 25 वयोगटातील तरुणांचा असणार सहभाग
सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवकांचे योगदान फारच महत्वाचे आहे. आपल्या देशातील युवा हा फार प्रगल्भ आहे. त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्यास त्याचा उपयोग आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी होऊ शकतो. अशा विविध क्षेत्रातील युवांचा लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग घडवून देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, या हेतूने भाजप युवा मोर्चाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात युवकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -