घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या 'या' प्रकल्पाला मुंबई हायकोर्टाचा धक्का

आदित्य ठाकरेंच्या ‘या’ प्रकल्पाला मुंबई हायकोर्टाचा धक्का

Subscribe

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘तिथे झालेले बांधकाम हे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा आहे’, अशा शब्दात न्यायालयाने महापालिकेला सुनावलं आहे.

पवई तलाव परिसरात सायकल ट्रॅकचे झालेले आणि नियोजित बांधकाम हे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने झालेले बांधकाम तात्काळ तोडून ती जागा पूर्ववत करावी, असे आदेशही हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. इतकंच नाही तर निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे, यासाठी तात्पुरती स्थगिती देण्याची पालिकेची विनंतीही हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळून लावली. पालिकेच्या वकिलांनी केलेल्या स्थगितीच्या मागणीवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “दिलेल्या निकालाला स्थगिती देणं म्हणजे आम्ही आमच्याच निकालाबद्दल ठाम नाही असा होतो, आणि आम्ही अशी कामं करत नाही.” या शब्दांत मुख्य न्यायमूर्तींनी पालिकेच्या वकिलांना समज दिली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही.जी. बिश्त यांच्या खंडपीठानं 25 एप्रिलला राखून ठेवलेला आपला निकाल शुक्रवारी जाहीर केला. न्यायालयाचा हा निर्णय आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेला धक्का देणारा आहे.

तलावालगत सायकल आणि जॉगिंग ट्रॅक व तलावाचं सुशोभीकरण केलं जाणार होतं. या कामाला वाजतगाजत सुरुवातही करण्यात आली होती, मात्र हा ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्यासाठी तलावात भराव टाकला जाणार आहे. तसेच या कामात इथली काही झाडंही तोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल, असा दावा करत ओमकार सुपेकर व अभिषेक त्रिपाठी या पीएचडी करणाऱ्या आयआयटीतील दोघा विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांचा दावा होता की, पवई तलावानजीक अनेक मोठी झाडं आहेत, याशिवाय तिथं विविध प्रजातीचे प्राणी आणि पक्षीही आहेत. याशिवाय तलावात मगर, कासव व विविध जलचरांचही अस्तित्वात आहे. सायकल ट्रॅकमुळे या नैसर्गिक संपत्तीला हानी पोहचून जनावरांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा येऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा –  मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -