शनिवारी (दि. १३ ) रोजी दोन गोरह्यांचा बळी घेतल्यानंतर आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबटयाने शेतकरी काशिनाथ पवार यांच्या खडकी मळा येथील गट नंबर ८५९ मध्ये गो-ह्यावर हल्ला करून ठार केला आहे. ही घटना शनिवारी घडलेल्या घटनास्थळापासून अवघ्या ७०० ते ८०० मिटर अंतरावर असल्याने शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळा वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करावा व गोधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाने तातडीने पाऊल उचलावीत, अशी मागणी दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज वैद्य यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.