घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुंबईकडे येणाऱ्या गाड्या धीम्या गतीने

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुंबईकडे येणाऱ्या गाड्या धीम्या गतीने

Subscribe

मुंबई – ऐन पिक अव्हर्समध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांना उशीर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याने ऐन गर्दीच्या वेळेस चाकरमन्यांनाना मनस्ताप झाला आहे.

ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान एका प्रवासाचा अपघात झाला. या अपघातात त्या प्रवासाचा मृत्यू झाला आहे. हा मृतदेह रुळावरून काढण्यास उशीर झाल्याने मध्य रेल्वेच वेळापत्रकही कोलमडले असल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या गाड्या आधीच उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना नियमित लेट मार्क लागत आहे. त्यातच आज विलंब झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -