घरताज्या घडामोडीअजितदादा तोंड उघडलंत तर महागात पडेल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

अजितदादा तोंड उघडलंत तर महागात पडेल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार झोपेत असताना अजित पवार सरकार स्थापन करुन मोकळे झाले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा आम्ही बोललो तर तुम्हाला महागात पडेल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राजकीय वर्तुळात सत्तापालटवरुन आरोपांच्या आणि टीकेच्या फैरी झडल्या आहेत. ठाकरे सरकार झोपेत असताना जाईल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देत सरकार जाणार असे विधान चंद्रकांत पाटील यांनी झोपेत केले होते की, जागे असताना केले असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केलेल्या विधानाचा चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत समाचार घेतला आहे. कोल्हापुरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरकार झोपेत कसं आणायचे हे अजित पवार यांना माहिती आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार झोपेत असताना अजित पवार सरकार स्थापन करुन मोकळे झाले होते. परंतु अजित पवारांना आपण काय केले हे लक्षात राहत नाही असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

- Advertisement -

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, अजित पवार यांना कोणी तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेले नव्हते. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसांसाठी सरकार स्थापन केले त्यांच्यावर टीका करताना अजित पवार यांनी काही तरी विचार केला पाहिजे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी विचार करुनच तुमच्यासोबत सरकार स्थापन केले. परंतु तुम्हाला तुमचे २८ आमदारही सांभाळता आले नसल्यामुळे ते शरद पवारांकडे परत गेले. ज्यांचे सरकार येणार त्यांच्यासोबत जाणार असे अजित पवार यांचे तत्व आहे. त्यामुळे अजित पवारांनी सांभाळून बोलावे आम्ही फाटके आहोत बोलायला लागलो तर महागात पडेल असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

सरकार झोपेत असताना जाईल असा नवा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. सरकार जाणार हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी झोपेत केले होते का जागे असताना असा सवाल अजित पवारांनी केला होता. तसेच महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजपमधील नेत्यांना असह्य झाले आहे. आपण सरकारमध्ये नाही हे सत्य सतात बोचत असतं. केवळ कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहत असतात. हे सरकार टीकणार असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -