घरताज्या घडामोडीफडणवीसांमधील असा एक गुण जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये नाही; भुजबळांचा खुलासा

फडणवीसांमधील असा एक गुण जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये नाही; भुजबळांचा खुलासा

Subscribe

शिवसेनेचा काल, शुक्रवारी दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टिका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर आज पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांना नैराश्य आले असून त्यांना फक्त मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षी होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते, परंतु ते स्वतः झाले. यामुळे इतर नेत्यांना बाहेर पडावं लागलं?’ फडणवीस यांनी असा सवाल करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मधील असा एक गुण सांगितला, जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही आहे.

फडणवीसांमधील तो गुण कोणता? 

छगन भुजबळ म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुखांचे बाळकटू मिळाले आहे. त्यामुळे दसऱ्याची जी फटकेबाजी आहे, तशी बाळासाहेब देखील करायचे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी केली. त्यात तथ्य सुद्धा आहे. अलीकडे सतत ज्या घटना घडतायत, ते तुम्ही पाहत आहात. लोकांसुद्धा हे आवडत नाही, कोणा-कोणाच्या घरात सात-आठ दिवस रेड सुरू आहे. ठिक आहे, त्या यंत्रणा आपले काम करत आहेत. पण उद्धव ठाकरे यांचं जे भाष्य आहे, ते ठिक आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्याला उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे फडणवीसांनी उत्तर दिले.’

- Advertisement -

‘पण फडणवीसांमध्ये एक गुण असता होता, तो गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही आहे. कारण फडणवीस यांच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवस मुख्यमंत्री क्लिनचीट देऊ टाकायचे. त्याच्यामुळे २०-२० वेळा वेगवेगळ्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतरही शेवट दोन-तीन दिवसांत क्लिन चीट आणि आतातर पोलीसाचा जो प्रमुख आहे तो बॉस झाला आहे. तो अगोदरच क्लिक चीट देणार आहे किंवा देत आहे. तर खालच्या लोकांना उत्तर द्यावंच लागणार आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यात हा गुण नाही आहे. शेवटी शेवटी फडणवीसांना क्लिनचीट मास्टर बोलत होते. पण ठिक आहे, सरकारवर टीका करणं हे विरोधपक्षाचे काम आहे. पण हा गुण आहे की अवगुण आहे, हे बोलू शकत नाही,’ असं भुजबळ म्हणाले.


हेही वाचा – ‘बाळासाहेब म्हणाले, सेना सोडली नसती तर मुख्यमंत्री….’

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -