घरताज्या घडामोडीचिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख बदलली; आता 'या' दिवशी होणार मतदान

चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार मतदान

Subscribe

कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून घोषणा केली आहे. त्यानुसार, या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये २६ फेब्रुवारी रोजी या मतदान होणार आहे. विशेष संपूर्ण प्रक्रियाही पुन्हा केली जाणार आहे.

कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून घोषणा केली आहे. त्यानुसार, या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये २६ फेब्रुवारी रोजी या मतदान होणार आहे. विशेष संपूर्ण प्रक्रियाही पुन्हा केली जाणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. (Chinchwad Kasba Peth By Election Dates Change Election Commission Declared)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कसबा पेठ आणि चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या या पत्रकानुसार महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाटी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी असेल. ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

- Advertisement -

त्याशिवाय, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २ मार्च रोजी इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील या दोन मतदारसंघांमध्येही मतमोजणी केली जाणार आहे. आयोगाच्या पत्रकानुसार ४ मार्चपूर्वी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.

दरम्यान, या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यातच आता निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये आयोगाने बदल केले आहेत.

१८ जानेवारी रोजी केलेल्या घोषणेनुसार निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील काही जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर २ मार्च रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील १२वीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल केला आहे.


हेही वाचा – अखेर सत्य समोर आलं! ‘त्या’ सात जणांची हत्याच; पोलिसांची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -