घरमहाराष्ट्रचिपी विमानतळाचे नामकरण वाद आधी विमानतळ सुरू करा,मग नाव द्या -मुख्यमंत्री

चिपी विमानतळाचे नामकरण वाद आधी विमानतळ सुरू करा,मग नाव द्या -मुख्यमंत्री

Subscribe

सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. येत्या २६ जानेवारीपासून येथे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळाला कोणाचे नाव द्यायचे याचे राजकारण सुरू झाले आहे. या विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव द्या, अशी मागणी नाथ पै यांच्या नातीने केली असताना भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, प्रथम विमानतळ सुरू करा, मग नाव द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ नारायण राणे ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला ‘स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ’ हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. तसेच नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असे मत व्यक्त केले आहे. मात्र प्रथम विमानतळ सुरू करा, मग नाव द्या, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

केंद्राने राज्याला नाव देण्याचा अधिकार असल्याचे सांगितले आहे. विमानतळ लवकर चालू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. 26 जानेवारी 2021 ला हे विमानतळ सुरू करण्याबाबत संबंधितांना सांगितले आहे. याबाबत परवाना (लायसन्स) मिळाले की लवकरच विमानतळ सुरू करू. हे विमानतळ अत्याधुनिक पद्धतीने बनवले असल्याने त्याचा मोठा उपयोग होणार आहे, असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -