घरताज्या घडामोडीआबांनी आडवी केलेली बाटली, सरकारने शेवटी रिचवलीच - चित्रा वाघ

आबांनी आडवी केलेली बाटली, सरकारने शेवटी रिचवलीच – चित्रा वाघ

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दिवंगत नेते आर आर आबा यांनी उभी बाटली आडवी करत आणलेली दारूबंदी ही महाविकास आघाडी सरकारने शेवटी रिचवलीच अशा तिखट शब्दांमध्ये त्यांनी दारूबंदीवर हल्लाबोल केला आहे. त्यासोबतच महिलांना आवाहनही त्यांनी सरकारविरोधात चार करण्याचेही आवाहन केले आहे. तर राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही या दारूबंदीच्या निर्णयाला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

भगीनींनो संसार वाचवायला कंबर खोचा

- Advertisement -

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -