पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हाणी होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आणि सर्व संबंधित जिल्ह्यांच्या पालक सचिवांना सतर्क राहण्याचे आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले. एनडीआरएफ जवानांना तसेच पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवा
– मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 5, 2022
रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी. पुरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Maharashtra | In the wake of heavy rainfall in various parts of the state, CM Eknath Shinde held a discussion with Chief Secretary Manukumar Srivastava along with directing all the related districts’ guardian secretaries to keep a vigil & control the situation: CMO
— ANI (@ANI) July 5, 2022
मुख्यमंत्री मुंबईतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. यामुळे खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.
जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.