घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंनी केले शिवसेनाप्रमुखांना स्मरण

बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंनी केले शिवसेनाप्रमुखांना स्मरण

Subscribe

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे उपस्थित होते.

गुरूपौर्णिमेला दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सर्वच नतमस्तक होत असतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक वेगळी भावना असते. आज गुरूपौर्णिमेच्यानिमित्त स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना वंदन करताना एक मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. यामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा यामुळे यासर्व घडामोडी शक्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जो काही विचार दिला. तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत, ते आम्ही करत आहोत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय. या महाराष्ट्रात मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला ताठमानेने जगण्याची शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार या महाराष्ट्रात आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सर्व सामन्यांना न्याय देण्याचं काम आमचं युती सरकार करेल. या राज्याचा सर्वांगिण विकास आमचं सरकार करेल. शेतकरी, कष्टकऱ्यांसह राज्याच्या विकास हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांना वंदन केलं आहे. त्यांचे आशीर्वाद घेतले असून ते माझ्या पाठिशी आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

यानंतर मी ठाण्याला धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जात आहे. आज गुरूपौर्णिमा असून गेले अनेक वर्ष न चुकता टेंभी नाक्यावर हजारो शिवसैनिक त्यांना वंदन करत असतात. मी देखील त्याठिकाणी त्यांना वंदन करण्यासाठी जात आहे, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी चिघळली; आणीबाणी जाहीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -