घरताज्या घडामोडीआता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक सवाल

आता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक सवाल

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे सांगत विरोधक अर्थसंकल्पावर टीका करत आहेत.

“आता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? हे दरवर्षी होणारं बजेट आहे. विरोधी पक्षाने खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. रेल्वेसाठी किती तरी मोठ्याप्रमाणात बजेट दिलं आहे. माझ्या माहितीनुसार २०१३ पासून ते आतापर्यंत नऊ पटीने रेल्वेसाठी बजेट वाढवलेलं आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिले. (CM Eknath Shinde Replied To The Criticism Of The Opposition On Union Budget 2023)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे सांगत विरोधक अर्थसंकल्पावर टीका करत आहेत.

- Advertisement -

“सगळ्याच समाजघटकांना न्याय देण्याचं काम करण्यात आलं आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानला गेला आहे. कुठलाही असा घटक नाही की तो या अर्थसंकल्पात वंचित राहील. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आतापर्यंत कोणत्याही बजेटमध्ये एवढी तरतूद केली नव्हती, तेवढी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

त्याशिवाय, “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा आली आहे. भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतेही विधान केलेले नाही. मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करताना शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे यापूर्वी सूचित केले होते. शेतकऱ्यांच्या दुप्पट झालेल्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव देण्यासाठी ठोस उपाय योजना करायला हवी होती, ती केली गेली नाही”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – यंदाचा अर्थसंकल्प गरिबांना आधार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा – एकनाथ शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -