घरताज्या घडामोडीबैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Subscribe

जी-20 बाबतच्या बैठकीचे निमंत्रण सगळ्यांनाच होते. देशप्रेम, विकासासारख्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? हेच देशप्रेम आहे का? हेच राज्याचे प्रेम आहे का?, असे सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

जी-20 बाबतच्या बैठकीचे निमंत्रण सगळ्यांनाच होते. देशप्रेम, विकासासारख्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? हेच देशप्रेम आहे का? हेच राज्याचे प्रेम आहे का?, असे सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, ते विराट मोर्चा काढत आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. आजच्या महत्त्वाच्या बैठकीला ते गैरहजर होते, यावरून त्यांचं प्रेम दिसते, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

जी-20 बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी शिंदे म्हणाले की, “आम्ही मुख्यमंत्री झाल्यावर आता काही लोक घराबाहेर येत आहेत. बेळगावच्या बाबतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका जाहीर केली आहे. बेळगाव मध्येच काय देशाच्या कुठल्याही भागात कोणी कोणाला रोखू शकत नाही. आमचे मंत्री मराठा बांधवांच्या पाठीशी उभे राहतील. आम्हाला कोणी आक्रमकपणा आणि धाडस शिकवू नये. ते विराट मोर्चा काढत आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. आजच्या महत्त्वाच्या बैठकीला ते गैरहजर होते, यावरून त्यांचं प्रेम दिसते”

- Advertisement -

त्याशिवाय, “चार-पाच महिन्यांमध्ये आम्ही जे निर्णय घेतले त्यामुळे काही जणांना धडकी भरली आहे. आरोपांना उत्तर द्यायला आम्ही रिकामे नाही”, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 बाबत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली होती. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही आमंत्रण होते. पण या दोन्ही नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली.

- Advertisement -

या बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जी-20 बाबत बैठक होती हे देशासाठी भूषणावह आहे. या बैठकीला देशातील अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. हा देशवासीयांचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात 14 समिट बैठका होणार आहेत, यामुळे महाराष्ट्र राज्याचं ब्रॅण्डिंग होणार आहे, मी बैठकीला उपस्थित होतो, त्या बैठकीत सादरीकरण करण्यात आलं” असे म्हटले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजप नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची वादग्रस्त वक्तव्य आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरोधात महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकासआघाडी 17 डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा काढणार आहे.


हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर; राज ठाकरेंकडून अभिवादन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -