जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुखदुःखात साथ देणारा समाज असून समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांचा आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जैन समाजासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी जैन समाजाप्रती भावना व्यक्त केली.
जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे. राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यामध्ये सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. तसेच या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
जिओ जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आचार्य पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहून जैन समाजबांधवांशी संवाद साधला.
याप्रसंगी जैन समुदायाचे गुरू परमपूज्य गुरुदेव श्री नयपद्मसागरजी महाराज साहेब यांना आचार्य पदवी बहाल करून गौरविण्यात आले. pic.twitter.com/Brznvs9P9W
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 11, 2023
राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले. तसेच या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील नवीन सरकार हे सर्व समुदायाना एकत्र घेऊन पुढे जाणारे सरकार असून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात त्याचेच प्रतिबंब पहायला मिळाले असल्याचे मत यासमयी नमूद केले. pic.twitter.com/YXrWIyND0S
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 11, 2023
हेही वाचा : ठाण्यात SRA ची गरजच काय? हे कार्यालय बंद करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी