घरताज्या घडामोडीशाळा पुन्हा बंद न करण्याचा निर्धार ठेऊ!

शाळा पुन्हा बंद न करण्याचा निर्धार ठेऊ!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनासाठीचे  निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली. त्यावेळी ठाकरे यांनी आज  सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला  आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा  मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे.  मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. या विषयावर टास्क फोर्सशी नियमित चर्चा होत असते. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होता, असेही  ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत. हवा खेळती असावी, शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या.पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. शिक्षकांना बरे वाटत नसेल आणि शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी   वीण उद्धव ठाकरे यांनी सर्व पालक आणि शिक्षकांना या निमित्ताने केली.

- Advertisement -

मुलांशी भावनिक संवाद साधणार : प्रा. वर्षा गायकवाड

आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज,त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधन सुविधांनुसार त्याच्या संपादणूक पातळीनुसार त्याची गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती  शालेय शिक्षण मंत्री  वर्षा गायकवाड यांनी दिली.

ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आज पासून सुरु होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले. पण कोरोनाची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही, असेही गायकवाड म्हणाल्या.

आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोत. विद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य वआणि अध्ययन निष्प:तीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित  तसेच सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेत्तर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य  आणि  मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -