घरताज्या घडामोडीCorona Virus : महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती?, कोरोना वाढल्यास निर्बंध लागणार, मुख्यमंत्र्यांकडून...

Corona Virus : महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती?, कोरोना वाढल्यास निर्बंध लागणार, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला आवाहन

Subscribe

राज्यातील जनतेला पुढील ८ ते १० दिवस फार महत्त्वाचे राहणार आहेत. या दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना परिस्थितीच्या आढाव्यानुसार निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर कडक निर्बंध नको तर नियम पाळा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली होती. टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा आढावा घेतला आहे. कोरोना पुन्हा राज्यात हातपाय पसरवत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे निर्बंध नाही. परंतु अशीच कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर पुन्हा निर्बंध लागू करण्याची वेळ येईल तसेच मास्कमुक्त महाराष्ट्रात पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती करण्यात येऊ शकते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी आणि एकंदरीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आला नाही परंतु राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

राज्यातील नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती नाही परंतु जर गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्क वापरला पाहिजे. नागरिकांना जर कठोर नियमावली नको असेल तर नियमांचे पालन करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच राज्यातील पुढील १५ दिवस महत्त्वाचे राहणार आहे. १५ दिवस कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल यानंतर महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यातील जनतेला पुढील ८ ते १० दिवस फार महत्त्वाचे राहणार आहेत. या दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना परिस्थितीच्या आढाव्यानुसार निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर कडक निर्बंध नको तर नियम पाळा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. शाळांबाबत महत्त्वाचा मत नोंदवण्यात आले आहे, ते म्हणजे शाळा सुरु करण्यास अडचण नाही परंतु १२ वर्षांखालील मुलांबाबत दक्ष राहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -