घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू; तर २१९० नवे रुग्ण

Coronavirus Update: आज राज्यात सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू; तर २१९० नवे रुग्ण

Subscribe

कोरोनामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिंतेची होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात तब्बल १०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रभरातल्या मृतांचा आकडा १८९७ वर गेला आहे. याशिवाय, राज्यात तब्बल २१९० नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ९४८ झाली आहे. यापैकी आज दिवसभरात ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या बाधितांची संख्या आता १७ हजार ९१८ इतकी झाली आहे. यानुसार राज्यात आजघडीला कोरोनाचे ३७१२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३४०१८ १०९७
ठाणे          ५१०
ठाणे मनपा ३०४८ ६८
नवी मुंबई मनपा २२९४ ३९
कल्याण डोंबवली मनपा १०५२ १८
उल्हासनगर मनपा २१४
भिवंडी निजामपूर मनपा १००
मीरा भाईंदर मनपा ५६३ १०
पालघर १२६
१० वसई विरार मनपा ६४५ १६
११ रायगड ५०२ १२
१२ पनवेल मनपा ३९४ १३
ठाणे मंडळ एकूण ४३४६६ १२९०
१३ नाशिक १२८
१४ नाशिक मनपा १६२
१५ मालेगाव मनपा ७२२ ४७
१६ अहमदनगर ६७
१७ अहमदनगर मनपा २०
१८ धुळे २९
१९ धुळे मनपा १००
२० जळगाव ३६५ ४६
२१ जळगाव मनपा १४०
२२ नंदूरबार ३२
नाशिक मंडळ एकूण १७६५ १२१
२३ पुणे ४१०
२४ पुणे मनपा ५८३० २७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३७४
२६ सोलापूर २७
२७ सोलापूर मनपा ६५२ ५०
२८ सातारा ३९५
पुणे मंडळ एकूण ७६८८ ३५०
२९ कोल्हापूर ३१८
३० कोल्हापूर मनपा २८
३१ सांगली ८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १९
३४ रत्नागिरी १९२
कोल्हापूर मंडळ एकूण ६५१
३५ औरंगाबाद २६
३६ औरंगाबाद मनपा १३०९ ५६
३७ जालना ७९
३८ हिंगोली १३३
३९ परभणी १९
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १५७२ ५८
४१ लातूर ८५
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ४५
४४ बीड ४०
४५ नांदेड १९
४६ नांदेड मनपा ८६
लातूर मंडळ एकूण २८४
४७ अकोला ३९
४८ अकोला मनपा ४४८ १८
४९ अमरावती १६
५० अमरावती मनपा १७८ १२
५१ यवतमाळ ११५
५२ बुलढाणा ५३
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ८५७ ४०
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४७५
५६ वर्धा १०
५७ भंडारा १९
५८ गोंदिया ४८
५९ चंद्रपूर १६
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली २६
नागपूर एकूण ६१२ १०
इतर राज्ये /देश ५३ १३
एकूण ५६९४८ १८९७

 

- Advertisement -

राज्यात १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी मुंबईमध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ ,नवी मुंबई मध्ये ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबाद मध्ये ४, नाशिक ३, सोलापूरात ३, सातारा -२, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला. मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील ५० रुग्ण आहेत तर ४५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २,अहमदनगरचा १, नंदूरबारचा १ मृत्यू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -