घरCORONA UPDATECoronavirus Update: २४ तासांत राज्यात २४३६ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६० जणांचा...

Coronavirus Update: २४ तासांत राज्यात २४३६ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६० जणांचा मृत्यू

Subscribe

आज पुन्हा राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला असून तब्बल २ हजार ४३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५२ हजार ६६७ झाला आहे. त्यासोबतच राज्यात आज दिवसभरात ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १६९५ झाला आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथिल केल्यानंतर अजूनही रुग्णांची संख्या कमी न होता वाढतच असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांसाठी हे एक मोठं आव्हान ठरलं आहे. त्यादरम्यान, बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र आज भर पडली आहे. आज दिवसभरात ११८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १५ हजार ७८६ झाला आहे.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३१९७२ १०२६
ठाणे          ४५७
ठाणे मनपा २७३९ ३८
नवी मुंबई मनपा २०६८ ३२
कल्याण डोंबवली मनपा ९४१
उल्हासनगर मनपा १८०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ९८
मीरा भाईंदर मनपा ४७५
पालघर १२०
१० वसई विरार मनपा ५९७ १५
११ रायगड ४३१
१२ पनवेल मनपा ३६० १२
ठाणे मंडळ एकूण ४०४३८ ११५४
१३ नाशिक १२३
१४ नाशिक मनपा १२९
१५ मालेगाव मनपा ७२१ ४४
१६ अहमदनगर ५७
१७ अहमदनगर मनपा २०
१८ धुळे २३
१९ धुळे मनपा ९५
२० जळगाव ३०१ ३६
२१ जळगाव मनपा ११७
२२ नंदूरबार ३२
नाशिक मंडळ एकूण १६१८ १०३
२३ पुणे ३६०
२४ पुणे मनपा ५३१९ २६०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३१७
२६ सोलापूर २४
२७ सोलापूर मनपा ५९९ ४०
२८ सातारा ३१४
पुणे मंडळ एकूण ६९३३ ३२१
२९ कोल्हापूर २४४
३० कोल्हापूर मनपा २३
३१ सांगली ७२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १६७
कोल्हापूर मंडळ एकूण ५२७
३५ औरंगाबाद २६
३६ औरंगाबाद मनपा १२६३ ४८
३७ जालना ६३
३८ हिंगोली १३२
३९ परभणी १८
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १५०८ ४९
४१ लातूर ७४
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ३७
४४ बीड ३२
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
लातूर मंडळ एकूण २४९
४७ अकोला ३६
४८ अकोला मनपा ३८४ १५
४९ अमरावती १५
५० अमरावती मनपा १६७ १२
५१ यवतमाळ ११५
५२ बुलढाणा ४१
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ७६६ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४६८
५६ वर्धा
५७ भंडारा १४
५८ गोंदिया ४३
५९ चंद्रपूर १५
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली १५
नागपूर एकूण ५७७
इतर राज्ये /देश ५१ १२
एकूण ५२६६७ १६९५

 

- Advertisement -

सर्वाधिक मृत्यू मुंबईत

राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ४७ जणांमध्ये ( ७८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६९५ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -