घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २४८७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ८९ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २४८७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ८९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाच्या रुग्णांनी आज ६७ हजार ६५५चा आकडा पार केला आहे. यापैकी तब्बल ३६ हजार ०३१ रुग्ण अजूनही अॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करून राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरू केलं असलं, तरी रुग्णसंख्या कमी करण्यात अजूनही राज्याला यश आलेलं नाही. याशिवाय राज्यात आज ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या मृतांचा आकडा आता २२८६ झाला आहे. राज्यात आज २४८७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर १२४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन ५.० आणि अनलॉक १, २, ३ लागू केल्यानंतर नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याचं आवाहन खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केलं आहे.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

 

- Advertisement -
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३९६८६ १२७९
ठाणे          ७०९
ठाणे मनपा ३७२१ ८२
नवी मुंबई मनपा २६७३ ६१
कल्याण डोंबवली मनपा १३१८ २५
उल्हासनगर मनपा ३३१
भिवंडी निजामपूर मनपा १३४
मीरा भाईंदर मनपा ६९९ १३
पालघर १४४
१० वसई विरार मनपा ८७४ २७
११ रायगड ६०९ १८
१२ पनवेल मनपा ४९९ २१
ठाणे मंडळ एकूण ५१३९७ १५४८
१३ नाशिक १६२
१४ नाशिक मनपा २२५
१५ मालेगाव मनपा ७४८ ५८
१६ अहमदनगर ९४
१७ अहमदनगर मनपा २६
१८ धुळे ३६
१९ धुळे मनपा १०४
२० जळगाव ४४९ ६३
२१ जळगाव मनपा १६७
२२ नंदूरबार ३५
नाशिक मंडळ एकूण २०४६ १६३
२३ पुणे ५४७ १२
२४ पुणे मनपा ६९०४ ३०८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४६८
२६ सोलापूर ४६
२७ सोलापूर मनपा ८५१ ६७
२८ सातारा ५२३ १६
पुणे मंडळ एकूण ९३३९ ४१५
२९ कोल्हापूर ४२८
३० कोल्हापूर मनपा २९
३१ सांगली १०१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग ३३
३४ रत्नागिरी २६४
कोल्हापूर मंडळ एकूण ८६६ १०
३५ औरंगाबाद ३९
३६ औरंगाबाद मनपा १४६२ ६४
३७ जालना १२५
३८ हिंगोली १४९
३९ परभणी ४३
४० परभणी मनपा २०
औरंगाबाद मंडळ एकूण १८३८ ६६
४१ लातूर ९८
४२ लातूर मनपा २७
४३ उस्मानाबाद ७३
४४ बीड ४७
४५ नांदेड २४
४६ नांदेड मनपा ८७
लातूर मंडळ एकूण ३५६ १०
४७ अकोला ४४
४८ अकोला मनपा ५४० २३
४९ अमरावती १६
५० अमरावती मनपा २१० १४
५१ यवतमाळ १३०
५२ बुलढाणा ६२
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण १०१० ४८
५४ नागपूर २७
५५ नागपूर मनपा ५४७ १०
५६ वर्धा १२
५७ भंडारा ३२
५८ गोंदिया ६६
५९ चंद्रपूर १६
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली ३५
नागपूर एकूण ७४४ ११
इतर राज्ये /देश ५९ १५
एकूण ६७६५५ २२८६

 

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यात ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. मुंबई -५२, नवी मुंबई -९,ठाणे – ५, कल्याण डोंबवली -४, मालेगाव -६, पुणे -९, सोलापूर -२, उस्मानाबाद -१, यवतमाळ १, आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४७ रुग्ण आहेत तर ३५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ८९ रुग्णांपैकी ५६ जणांमध्ये ( ६३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५० मृत्यूंपैकी मुंबई २७, नवी मुंबई -९, मालेगाव -६,कल्याण डोंबिवली -४, ठाणे -३, सोलापूर- १ असे आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,६२,१७६ नमुन्यांपैकी ६७,६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३५८५ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २७२२ एवढे आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३१५७ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,४९० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -