पुण्यात २४ तासांत १ हजार २५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा नोंद झाली असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३ हजार ६८०वर पोहोचला आहे, अशी माहिती पुण्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
1251 positive cases and 25 deaths were reported in the last 24 hours in #Pune district; total positive cases in the district is 23,680: Pune Health Department, Maharashtra
— ANI (@ANI) July 1, 2020
मुंबईत आज १ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ७५ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ७८ हजार ७०८वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ६२९ झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे. सविस्तर वाचा
आज गोव्यात ७२ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गोव्यात एकूण कोरोनोबाधितांचा आकडा १ हजार ३८७वर पोहोचला असून सध्या ७१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत गोव्यात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
72 samples have tested positive for #COVID19 today, taking the total number of cases to 1387. There are 713 active cases and 670 patients have recovered till date. Death toll is at 4: Directorate of Health Services, Goa pic.twitter.com/50QlCucTO7
— ANI (@ANI) July 1, 2020
कल्याण-डोबिंवलीत आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू
कोरोना संकटात आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे रुग्णांनी टाळ्या वाजवत केले स्वागत
राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८० हजार २९८वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ८ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा
वसई विरारमध्ये १७५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा ४ हजार ३१२वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत वसई-विरारमध्ये २ हजार ७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आधारवाडी मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना कारागृहातून बाहेर काढून तात्पुरत्या स्वरुपात कल्याणमधील डॉनबॉस्को हायस्कूलमध्ये जेल क्वारांटाईन केले असता पोलीस बंदोबस्त तैनात असलेल्या या कैद्यांनी काल पलायन केल्याची घटना घडल्याने येथे खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आधारवाडी कारागृहाचे पोलीस शिपाई अशोक पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. गेल्या पंधरा दिवसात कैदी पळल्याची ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पंधरा दिवसापूर्वी आपल्या पत्नीच्या हत्येत आरोपी असणाऱ्याला टाटा आमंत्रा येथे कोरोनाबाबत उपचारार्थ दाखल केले होते. मात्र गर्दीचा फायदा घेत या कैद्याने तेथून पलायन केले होते.
सोशल डिस्टन्सिंगचा उडला फज्जा; केडीएमसीचा नियोजनशून्य कारभार
राज्यात मागील २४ तासांत ७७ नव्या कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली असून एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ हजार १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ६० पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. सविस्तर वाचा
77 police personnel found positive for #COVID19 & 1 died in Maharashtra in the last 24 hours, taking the total number of active cases to 1,015 and death toll to 60 in the force: Maharashtra Police pic.twitter.com/ueab4qAHLj
— ANI (@ANI) July 1, 2020
नाशिक शहर पोलीस दलात करोनाचा पहिला बळी
नाशिक जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घातला असून नाशिक ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ नाशिक शहर पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलीस दलातील एका करोनाबाधित पोलीस कर्मचार्याचा करोनामुळे झाला असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस दलातील पहिला करोना बळी आहे. दरम्यान, शहर पोलीस दलात ८ कर्मचारी करोनाबाधित आहेत. त्यापैकी ५ करोनामुक्त झाले आहेत. अद्याप दोघांवर उपचार सुरू आहेत. (सविस्तर वाचा)
कोरोनाच्या वाढत्या प्रभावात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. गोव्यात बुधवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मडगावच्या कोविड रुग्णालयात उपचार घेताना मरण आलेल्या रुग्णांची संख्या एकूण चार झाली आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ही ६४ वर्षीय ताळगाव येथे राहणारी होती.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक भान जपत यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे.
Instead of celebrating Ganeshotsav in a grand way, Labaughcha Raja Mandal will donate the amount to CM’s Relief Fund. We will also felicitate families of martyrs who have lost their lives at LOC & LAC: Sudhir Salvi, Secretary of Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal https://t.co/BT5uTkfFC4 pic.twitter.com/unI3cbkGmR
— ANI (@ANI) July 1, 2020
भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची एकूण संख्या सहा लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५ लाख ८५ हजार ४९३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १७ हजार ४०० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ३ लाख ४७ हजार ९७९ लोकं बरे झाले आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत १८ हजार ६५३ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद कऱण्यात आली आहेत तर ५०७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
507 deaths and 18,653 new #COVID19 cases in the last 24 hours; Positive cases in India stand at 5,85,493 including 2,20,114 active cases, 3,47,979 cured/discharged/migrated & 17,400 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/9Faj9kP65c
— ANI (@ANI) July 1, 2020
कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टर रुग्णांची अहोरात्र सेवा करण्यात गुंतले असताना कोरोनाशी लढताना तब्बल १८ डॉक्टर शहीद झाले आहे. इतकेच नव्हेतर १२०० पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. आज १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जात असताना डॉक्टरांकडून होत असलेल्या कोरोनारुग्ण सेवेबद्दल समाजात आदराची भावना आहे.