राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. या शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. काल मध्यरात्रीपासून म्हणजेच २० तारखेपासून मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे बंद राहणार आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी १० ते १२ उघडी राहणार आहेत. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. असा आदेशच पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.
#COVID19: Pune Municipal Corporation has passed an order to declare the complete area under the jurisdiction of Pune Municipal Corporation a Containment Zone, from today midnight till 27th April. #Maharashtra
— ANI (@ANI) April 19, 2020
देशात कोरोनाचा वाढत जाणारा धोका लक्षात घेता ३ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र त्यापुर्वी आपल्या राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोन भागात उद्योग व्यवसायासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्यापासून काही प्रमाणात मुभा दिली आहे. मात्र ज्या भागात बाधित रुग्ण आढळत आहे. अशांना मुभा देण्यात आली नाही. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक रूग्ण असल्याने पुणे संपूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं पोलिसांनी आवाहन केलंय.
या सीमा सील होणार
पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द संक्रमणशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलंय. या संक्रमणशील क्षेत्राला २७ एप्रिलपर्यंत सील करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही.
पुणे – १७ (मृत्यू १)
पुणे मनपा – ५४६ (मृत्यू ४९)
पिंपरी-चिंचवड मनपा – ४८ (मृत्यू १)
लॉकडाऊनचे नियम
१. संक्रमणशील क्षेत्र वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरू करायचे असल्यास ते स्थानिक कामगार किंवा सर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करावे लागणार.
२. संक्रमणशील क्षेत्रातुन कोणालाही बाहेर पडता येणार नाही अथवा बाहेरील व्यक्तीला आत येणार नाही.
३. संक्रमणशील क्षेत्राच्या बाहेर असे उद्योग सुरू करायचे असल्यास त्या उद्योगांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची तेथेच राहण्याची सोय करावी लागेल.
४. आयटी कंपन्यांना देखील हे नियम लागु असेल. हे निकष पूर्ण करणाऱ्या उद्योगांनाा परवानगी.
हे ही वाचा – Coronavirus : लॉकडाऊन २.० सवलतीबाबत केंद्र-राज्यांत मतभेद