भारतात करोना बाधित रुग्णांचा आकडा आता वाढीस लागला असून रात्री ११ वाजेपर्यंत एकूण ६४७ रुग्णांची नोंद झाली होती. तर यापैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्र आणि केरळ राज्यात तर रुग्णांच्या आकेडवारीने शंभरी पार केलेली आहे. महाराष्ट्रात दोन मृत्यू झाले आहेत. देशातील एकूण संख्या पाहण्यासाठी तुम्ही https://www.covid19india.org या डॅशबोर्डवर जाऊ शकता.
कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
देशभरात दिवसेंदिवस करोना व्हायरस झपट्याने पसरत आहे. आतापर्यंत देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ५००हून अधिका झाली आहे. सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात करोनाचे १०७ रुग्ण आढळले. त्यातील १५ जण करोनामुक्त झाल्याचे देखील समोर आलं आहे.