घरमहाराष्ट्रकोरोना काळातील कंत्राटी आरोग्य सेविकांना कायम करण्याचा निर्णय, ५९७ कर्मचाऱ्यांना दिलासा

कोरोना काळातील कंत्राटी आरोग्य सेविकांना कायम करण्याचा निर्णय, ५९७ कर्मचाऱ्यांना दिलासा

Subscribe

कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात आलेल्या या आरोग्य सेविकांचे ११ महिन्यांचे कंत्राट होते. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांचे कंत्राट पुढे सुरू ठेवण्यात आले नाही

मुंबई – कोरोना संसर्गाच्या कालावधीत कंत्राटी स्वरूपात विविध विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या ५९७ आरोग्य सेविकांना कायमस्वरुपी म्हणून कामावर रुजू करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यामुळे कोरोनात   निरंतर रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला.

कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात आलेल्या या आरोग्य सेविकांचे ११ महिन्यांचे कंत्राट होते. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांचे कंत्राट पुढे सुरू ठेवण्यात आले नाही. त्यामुळे उपासमारीचे संकट ओढवलेल्या आरोग्य सेविकांनी आरोग्य सेवेत कायमस्वरूपी म्हणून दाखल करून घेण्याची मागणी केली होती. राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने आरोग्य सेविकांची मागणी लक्षात घेऊन ५९७ आरोग्य सेविकांना कायमस्वरुपी शासन सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. या आरोग्य सेविकांना उप संचालक, आरोग्य सेवा परीमंडळे यांनी त्यांचे मंडळातील एनयुएचएम, आरबीएसके, आदिवासी, बिगर आदिवासी, नक्षलग्रस्त व अर्बन आरसीएच कार्यक्रमाअंतर्गत रिक्त पदावर नेमणुका द्यावात, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

- Advertisement -

आरोग्य सेविकांना नेमणुका देताना त्यांची सेवा जेष्ठता यादी तयार करावी. त्यानुसार समुपदेशाने रिक्त पदावर समायोजन करावे. एकाच दिवशी सेवेत रुजू  झालेल्या आरोग्य सेविकांची सेवा जेष्ठता ठरवताना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे शेवटच्या वर्षाचे गुण बघून जास्त गुण असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -