घरताज्या घडामोडीकोरेगाव-भीमा शहीद स्मारक समिती गठीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

कोरेगाव-भीमा शहीद स्मारक समिती गठीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Subscribe

कोरेगाव-भीमा शहिदांच्या स्मारकासाठी घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावा यासाठी समितीकडून लढ्याचा इतिहास अधिक स्पष्टपणे नोंदवला जाईल. या परिसराचा विकास करण्याबरोबरच सार्‍या सुविधा पुरवण्याचा शब्द शासन पूर्ण करेल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांनी कोरेगाव-भीमा लढ्यातील शहिदांना तिथे जाऊन अभिवादन केले, तेव्हा ते बोलत होते.
कोरेगाव भीमा येथे जे शूरवीर शहीद झाले. त्या सर्वांना अभिवादन करताना हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात रहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. या समितीत अशासकीय सदस्यांचाही समावेश केला जाईल. स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था आदी सुविधा करण्यास शासनाचे प्राधान्य राहील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शौर्य दिनाला येणार्‍या अनुयायांसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुयायांना जयस्तंभास सुलभतेने अभिवादन करता यावे यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केले होते. पीएमपीएल तर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती, याचीही माहिती घेत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

- Advertisement -

नियमांचे भान राखा

कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्न समारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाचा नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. पाश्चात्य देशात प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसर्‍या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -