मुंबई : येत्या २४ जानेवारीपासून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी दिली. तसे निर्देश विभागाला दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा, त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे वआणि निवासी शाळा सुरू कराव्यात. यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.
कोविडचा संसर्ग अचानक वाढल्याने शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला होता. शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, कोविडची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत आहे. (1/3 )
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 21, 2022
राज्यात येत्या सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाची परिस्थिती अटोक्यात येत असून, सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये आणि निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत, त्या-त्या स्थानिक प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.