घरमहाराष्ट्रपौष्टिक आहार घेण्यासाठी ‘ईट राईट इंडिया’चा नारा

पौष्टिक आहार घेण्यासाठी ‘ईट राईट इंडिया’चा नारा

Subscribe

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत विद्यार्थ्यांनी पौष्टिक आहार घेण्याची शपथ घेतली आहे.

देशभर पौष्टिक आहार देण्याची शपथ घेण्यात आली आहे. ‘ईट राईट इंडिया’ने एका साताऱ्यातील एका कार्यक्रमात ही शपथ घेतली आहे. देशातील काश्मीर, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, तिरुअनंतपुरम, रांची आणि गोवा या सहा ठिकाणांहून स्वस्थ भारत यात्रा निघाली आहे. तिरुअनंतपुरम येथून निघालेली ही यात्रा पाचवड येथील महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज याठिकाणी आली आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत पौष्टिक आहार घेण्याची शपथ घेतली आहे.

विद्यार्थ्यांनी घेतली पौष्टिक आहार घेण्याची प्रतिज्ञा

विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवा पिढीने शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी काय खावे? काय खाऊ नये? याबाबतची सविस्तर माहिती या कार्यक्रमात सांगण्यात आली. आपल्या दैनंदिन आहारामधील साखर, मीठ आणि तेलाचे प्रमाण योग्य ठेवल्यास त्याचा शरीरावर कशाप्रकारे चांगला परिणाम होतो याबाबत देखील या ठिकाणी सांगण्यात आले. तसेच मानवी जीवनामधील आहाराचे महत्त्वही तितेकच महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी पौष्टिक आहार घेण्याची प्रतिज्ञा देखील घेतली. त्या अनुषंगाने या यात्रेचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेले आहे. सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास करणारी ही यात्रा खंडाळा या ठिकाणी कार्यक्रम घेत पुढे २६ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे पोहोचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -