मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले आहेत. दरम्यान कालच संजय राऊत यांच्यावर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून ईडीने त्यांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाधवान बंधूंसोबत संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचेही यात म्हणटले आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.