पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. देशातील शेतकऱ्यांनी या कृषी कायद्यांविरोधात मागील ११ महिन्यांपासून आंदोलन पुकारले होते. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. बळीराजापुढे केंद्र सरकार झुकले अशी प्रतिक्रिया सर्वच राजकीय नेत्यांकडून येत आहे. देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अंहकाराला झुकवले असल्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना देशातील तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी गुरुनानक जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे कायदे आणले होते. अनेक तज्ञांशी चर्चा करण्यात आली परंतु हे कायदे आता आम्ही रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदींच्या निर्णयावर राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय नेत्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच आगामी निवडणुकांमुळे हा निर्णय मागे घेतला असल्याची टीका केली आहे.
राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करुन अहंकाराला झुकवले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना शुभेच्छा देत जय हिंद, जय हिंद का किसान असा नारा लगावला आहे.
देश के अन्नदाता ने सत्याग्रह से अहंकार का सर झुका दिया।
अन्याय के खिलाफ़ ये जीत मुबारक हो!जय हिंद, जय हिंद का किसान!#FarmersProtest https://t.co/enrWm6f3Sq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2021
आंदोलन मागे घेण्यात येणार नाही – राकेश टिकैत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेणार नाही असे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. “आंदोलन तत्काल वापस नहीं होगा, हम उस दिन का इंतजार करेंगे जब कृषि कानूनों को संसद में रद्द किया जाएगा । सरकार MSP के साथ-साथ किसानों के दूसरे मुद्दों पर भी बातचीत करें” आशा आशयाचे ट्विट राकेश टिकैत यांनी केलं आहे.
आंदोलन तत्काल वापस नहीं होगा, हम उस दिन का इंतजार करेंगे जब कृषि कानूनों को संसद में रद्द किया जाएगा ।
सरकार MSP के साथ-साथ किसानों के दूसरे मुद्दों पर भी बातचीत करें : @RakeshTikaitBKU#FarmersProtest
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) November 19, 2021
राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी जय हिंद अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जय किसान ! 🇮🇳
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 19, 2021
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवनाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले.या अत्याचाराची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही.
कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते, हे पुन्हा सिद्ध झाले.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 19, 2021
नवाब मलिकांची खोचक प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, झुकती है दुनिया झुकनेवाला चाहिए, शेतकऱ्यांनी मागील ११ महिन्यांपासून आंदोलन करुन मोदी सरकारला झुकवले आहे. अखेर मोदी सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले आहेत.
‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’
तीनों कृषि कायदे वापस लिए गए,
हमारे देश के किसानों को मेरा सलाम और शहीद किसानो को अभिवादन— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
नाना पटोले यांची प्रतिक्रिया
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील कृषी कायदे रद्द केल्यावरुन देशातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं. आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली. हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, ‘मोडेन पण वाकणार नाही’… ‘दिल्लीच्या तख्ता पुढे झुकणार नाही’ हे बळीराजाने सिद्ध केलं आहे. शेती कायदे शेतकऱ्यांना समजवून सांगण्यात आम्ही कमी पडलो असं पंतप्रधान म्हणतात. वास्तविक, शेतकऱ्यांना हे कायदे पूर्ण समजले म्हणूनच इतकं मोठं आंदोलन झालं.
बळीराजानी सिद्ध केलं
‘मोडेन पण वाकणार नाही’… ‘दिल्लीच्या तख्ता पुढे झुकणार नाही’… pic.twitter.com/ME2mVMlU3Q— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2021
सचिन सावंत यांची प्रतिक्रिया
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन सावंत म्हणाले की,निवडणुका समोर ठेवून आता मोदी सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. पण जे अनन्वित अत्याचार बळीराजावर केले गेले, ज्या पध्दतीने त्याला देशद्रोही म्हटले गेले, जो खिळे तारांचा आणि संगिनींच्या विळखा घातला गेला, जीपच्या टायर खाली चिरडले गेले हे शेतकरी कधीच विसरू शकणार नाही. हा मोदी सरकारच्या अत्याचार, अनाचार व प्रचंड अहंकारावर शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा, धैर्याचा आणि एकजुटीचा विजय आहे. या न्यायाच्या लढाईत काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी व राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरुवातीपासून शेतकऱ्यांबरोबर राहिला याचे समाधान आणि आनंद आहे.
हेही वाचा : Farms Laws: कृषी कायदे रद्द करण्याचे कारण निवडणूका ? कोणत्या राज्यात किती जागा ?